अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४४

 अंबाला एका राजकुमारी ची प्रेमकथा भाग ४४





क्रमशः पुढे चालू.......

अश्वावर स्वार होऊन निघून आलेल्या अंबालेस अन्न गोड लागेना झाले होते. ती कोणत्याही नगरात राहण्यापेक्षा अरण्यात राहू लागली. पण ज्या त्रिशलेस ती मागे टाकून आली होती. तिच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. अरण्यात राहून तेथील नदीवर अंघोळ केल्यामुळे तिची काजळी धुवून जाऊ लागली. तिच्या मनात त्रिशलेस सोडवण्याची उत्कट भावना जागृत होत होती.

पण आता तिला सोडवणे कठीण झाले होते. आता ती पुन्हा गौरवर्णीय दिसू लागली होती. जंगलात राहून त्रासलेली अंबाला नगराजवळील ग्रामी आली. असता तिला समजले की त्रिशलेस सुळावर चढवले जाणार आहे. पण तिला दिलेली शिक्षा अन्याय कारक होती. कारण राज्यात कोणत्याही स्त्रीस सुळावर चढवले जात नव्हते. व त्रिशलेस सुळावर चढवले जाणार असल्याचे समजल्या पासून ती बेचैन झाली. तिने जवळून जाणाऱ्या एका वाटसरू कडून माहिती मिळवली. व तेथून जाताना एका घरामागील सुकत घातलेली एका नारीची वस्त्रे तिने उचलली. व ती अरण्यात गेली. आता तिची तिला लाज वाटू लागली. कारण स्वतःच्या बदल्यासाठी तिने त्रिशलेस मृत्यच्या जबड्यात टाकले होते. आपले काहीही होवो. आपण त्रिशलेस या मृत्यूच्या सापळ्यातून वाचवायचे तिने ठरवले.

तो काळा दिवस उजाडला. दोन दिवसांनी फाल्गुन अमावस्या होती. अंबाला एका वृक्षाच्या ढोलीत विसावली होती. अचानक तिला एक काळसर्प चावत आहे. व एक काळसर रंगाचा पुरुष तिच्या रक्षणार्थ भाला घेऊन उभा आहे. असे स्वप्न पडले. तिला जाग आली. तिने पहिले सर्वत्र उजेड पडला आहे. पुर्व क्षितिजावर रविराज उगवला आहे. ती तेथून खाली उतरली. व नदीवर आली. तिने तिथे स्नान केले. व स्नान करतेवेळी तिला नदीपालिकडे एक शिव मंदिर दिसले. सदर मंदिर जुन्या काळातील एका राजवटीत बांधले गेले होते. प्रांगणातील नंदीवरून तिने ते शिव मंदिर असल्याचे ओळखले. प्रभातीची वेळ असल्याने कोणी तिथे नव्हते. ती तिथे गेली. मंदिरात अनेक कोळीस्टके होती. तिने बाजूच्या झुडपातील डहाळ्या काढल्या. व संपूर्ण मंदिर झाडून काढले. व स्वच्छ केले.

त्यानंतर तिने आपल्या अंगावरील वस्त्र ओले करून नंदी व शिव पिंडीस पाणी घातले. नंतर तेथील जवळील रानातील फुले फळे व बिल्वपत्रे तिने वाहिली. व नमस्कार केला. व त्रिशलेच्या सुटकेविषयी तिने प्रतिज्ञा केली. व साकडे घातले. व पुन्हा अरण्यात आली. व आपला पेहराव बदलला. व आपली तलवार तिने एका बांबूच्या काठीत लपवली. व एका वृध्द म्हातारीचा पेहराव करून ती राजधानी नगराच्या दिशेने निघाली.

नगरात आल्यावर ती वृध्द म्हातारी प्रमाणे काठी टेकत चौकशी करत ती त्या वधस्थंभ असणाऱ्या नगरातील मध्य चौकात असणाऱ्या प्रांगणाकडे निघाली. शिपाई त्रिशलेस ढकलत ढकलत त्या ठिकाणाला घेऊन चालले होते. वाटेत नगरातील व राज्यातील अनेक लोकांची गर्दी झाली होती. तिला अनेक लोक दगड मारत होते. व राज्यद्रोही देखील म्हणत होते. अंबाला गर्दीतून वाट काढत तिकडे निघाली. लोकांचे कडे तोडत ती पुढे जाताना एक स्त्री तिला म्हणाली, “ अहो आजीबाई, तिथे काही अन्न वाटणार नाहीत. एवढ्या गडबडीने निघालाय.”

वृध्द वेशातील अंबाला, “तेच पाहायला जातेय मुली मी, की ती धाडशी कुंतल कन्या कोण आहे ते.”

ती सरळ त्या निर्माण केलेल्या वधस्तंभाजवळ असणाऱ्या गराड्यात आली. तिथे त्रिशलेस बांधले होते. तिच्या शरीरावर चाबकाचे वळ होते. अंगावरील कपडे फाटलेली होती. तिच्या भोवती शिपायांचा पहारा होता. जवळच असणाऱ्या उंच असनावर महारुद्र, राजमाता श्यमलाता व दरबारातील मंत्री अन् राज्य न्यायदंड अधिकारी विराजमान झाले होते.

अंबाला सैन्याचा गराडा न्याहाळत आत शिरण्यासाठी पाहू लागली. व एके ठिकाणी असणाऱ्या बांबूच्या पोकळ खिंडारातून ती आत शिरली. तिथे आल्यावर सैनिकांनी तिला हटकले. तेव्हा तिने त्या पहारेकरू सैन्यास ढकलले. व ती आत शिरली. व त्रिशलेजवळ जाऊन तिने तिला मिठी मारली. ते पाहताच त्रिशला तिला म्हणाली, “आंबे कशाला आलीस इथे, जा निघून.”

तेवढ्यात जवळचे सैनिक धावले. व तिला पकडण्यास धजावले. आंबालेने लगेच आपल्या हातातील काठीत लपलेली तलवार उपसत त्या सैनिकास म्हणाली, “थांबा तिथे नाहीतर एकेकास यमसदनी धाडेन.”

तिचा तो कठोर आवाज ऐकताच सैन्य थबकले. व तिच्या हातातील तलवारीला पाहू लागले. ती त्याना परिचयाची वाटली. इतक्यात महारुद्र आपल्या सिंहासनावरून उठत “ कोण आहेस तू. व या राजद्रोही स्त्रीचा व तुझा संबंध काय?”

वृध्द वेशातील अंबाला त्यास म्हणाली, “ त्रिशला राजद्रोही नाही. व तिने नाही मारले प्रधान वेददत्त यांना, ते दुसऱ्या शत्रूकडून मारले गेले. व राजद्रोहाचे म्हणत असाल तर प्रधान वेददत्त हे राज्याचे खरे द्रोही आहेत. त्याचा हा घ्या पुरावा.”

श्यामलता, “ पण तू कोण आहेस. व तुझा या राजघराण्याशी संबंध काय? व एखाद्या जबाबदार व्यक्तीवर तू जे आरोप करत आहेस. त्यास शिक्षा देण्याचा अधिकार तुला कोणी दिला.”

अंबाला, “ राजमाता मला ओळखले नाही का? मी आहे अंबाला, राजकुमारी अंबाला, महाराज जयवर्धन व महाराणी अरूणावती यांची कन्या.”

ती आपला वृध्द स्त्री पेहराव टाकून ती उभा राहिली. तिने आपला डोक्याचा टोप काढून टाकला.

अंबाला असे म्हणताच जो तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तिच्या हातात राज तलवार चमकत होती.

महारुद्र तिच्याकडे पाहू लागला. ती सूर्याच्या तेजाने तळपत होती. तिचे लांबसडक काळेभोर केस उन्हात चमकत होते. व ती एखाद्या सुंदर देवतेप्रमाणे दिसत होती. तिला पाहताच त्या कृष्णकुमारी इंद्रावतीची आठवण झाली. तो तिच्याकडे पहातच राहिला.

महारुद्र, “ आपण स्वतःस राजकुमारी म्हणता याचा काही पुरावा.”

अंबाला, ( हसत)“ पुरावा हा घ्या. ही माझी कुलदेवता शिव शंकराचे प्रतीक असणारी साखळी. व माझी ही राज्यतलवार. व ती राज्य न्यायदंड अधिकाऱ्यांना प्रधान वेददत्त यांचे ते पत्र देते.

त्यामुळे तिथे असणारी सर्व रयत अंबालेस पाठिंबा देते. व त्रिशलेस सोडण्यास सांगू लागतात. एकच गलका होतो. शिपाई ही अंबालेस ओळखतात व तिला न्याय मिळाला पाहिजे. ती राज्याची खरी वारस आहे. हे बोलू लागतात. तेव्हा पुरावे तपासून राज्य न्याय दंडाधिकारी सर्वतोपरी निर्णय महारुद्र वर सोपवतात.

महारुद्र, “ सर्व पुरावे पाहून व तेथील जनमत पाहून निर्णय जाहीर करतो.

“ सदर घटने नुसार आपणास झालेले कष्ट व आपणावर आलेली संकटे पाहता, तसेच इतर सादर पुरावे पाहता आपण या राज्याच्या खऱ्या वारस आहात. त्यामुळे एका राज्यपद अधिकारी व्यक्तीस शासन करणेचा मज अधिकार नाही. इथून पुढील निर्णय राज्याचे वारस या नात्याने आपण घ्याल. मी व माझे कुटुंब तुम्हास झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व सदर राज्य पदावरील माझा हक्क मी सोडत आहे. तसेच मी व माझे कुटुंबीय हे राज्य सोडून जात आहोत. यासाठी मला एक सप्ताहाची मुदत मिळावी. व जर आपणास वाटले की प्रधानाच्या गुन्ह्याची शिक्षा मज द्यावी तर ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”

असे बोलून आपला निर्णय देवून तो निघून गेला. महाराणी श्यामलता दुःखी होऊन निघून गेल्या. महारुद्राच्या या न्यायीवृत्तीने लोक प्रभावीत झालीत. व त्याचा जयजयकार करू लागली.

….. ….. ….. …… …..

क्रमशः पुढे.....

Comments